मी मांडीवर ठेवुनी डोके तुझ्या,
ऐकवाव्या गुलमोहराच्या कविता माझ्या.
ऋतू नसावेत कवितेमध्ये,
तव नयनांचा रंग असावा.
गार मंद त्या वाऱ्यामध्ये,
तुझ्या केसांचा गंध असावा.
शब्द नकोत फार बोलके,
मौनालाही छंद असावा.
मनात उमलत्या भावनांना,
ओठांपाशी बंध असावा.
मी मांडीवर ठेवुनी डोके तुझ्या,
ऐकवाव्या गुलमोहराच्या कविता माझ्या.
ऋतू नसावेत कवितेमध्ये,
तव नयनांचा रंग असावा.
गार मंद त्या वाऱ्यामध्ये,
तुझ्या केसांचा गंध असावा.
शब्द नकोत फार बोलके,
मौनालाही छंद असावा.
मनात उमलत्या भावनांना,
ओठांपाशी बंध असावा.
मीही असतो अधुरा,
तूही असतीस अधुरी,
म्हणूनच कदाचित
आपली भेट लिहिली असेल नियतीने,
दोन अपूर्ण कथा
एक संपूर्ण कविता व्हावी म्हणून.
रात्र नसती अंधारलेली,
तू शेजारी असतीस तर.
उजळली असतीच रात्र,
तू शर्वरी असतीस तर.
श्वास झाले असते सूर,
तू बासरी असतीस तर.
गंधाळले असते अक्षर,
तू अक्षरी असतीस तर.
हर दर पे उम्र भर की सदाएँ भी बेअसर,
शायद अभी अपने ही मकाँ की तलाश में हो।
मंदिर भी गए, मस्जिदों से लौट आए तुम,
फिर किस ख़ुदा की तलाश में हो।
दरिया ने बस इतना ही पूछा बहाव में,
किस बेनिशाँ किनार की तलाश में हो।
जो खो गया था, वो तो तुम्हारे ही पास था,
फिर किस और आसमाँ की तलाश में हो।
शायद ये सफ़र ख़त्म न हो उम्र भर,
जब तक तुम अपनी ही तलाश में हो।
उगा भटकलो कुठे कुठे मी कित्येक वर्षे,
रस्ते घरी वळू लागले, तू भेटल्यापासून.
दुःखास झाकून ठेवले हसऱ्या मुखवट्यांमध्ये,
डोळे खरे बोलू लागले, तू भेटल्यापासून.
नभ तेच, चंद्र तोच, तीच रात्र होती तरी,
ताऱ्यांना अर्थ येऊ लागला, तू भेटल्यापासून.
ना मागितले मी प्रेम, ना तू दिलेस वचन,
तरी आयुष्य खुलू लागले, तू भेटल्यापासून.
जिंदगी मला तू एक सोपा प्रश्न दे
का मला नेहमी निवडावे लागते
प्रत्येक हातात एक भाकरीचा कोर दे
का चिमुकल्यांना आकाशी बघावे लागते
देऊनी सर्वस्व माझे मी कंगाल जाहलो
अन आता प्रेमही उसने मागावे लागते
प्रेम किनाऱ्याने करावे नदीवर कितीही तरी
तिला शेवटी सागराशीच मिसळावे लागते
(1)
स्पर्शाविना स्पर्शून जाणे तिचे,
जसा श्वासांत मिसळावा रातराणीचा गंध;
न जाणे कसे बिलगून जाणे,
जसा सागराच्या मिठीत विरघळावा चंद्र.
(2)
जगला की लिहिता येतं, एवढंच असतं खरं,
जखमांच्या ओठांवरच असतं कवितेचं घर.
सुखाच्या वाटसरूंना जगण्याची काय खबर,
वेदनांच्या पाऊलखुणांतच असते अनुभवांची सफर.
(3)
पावसाच्या सरींचा मारा फार आहे,
श्रावणाचा नदीला केवढा भार आहे.
तिच्या प्रवासाला आहे कोणता आधार?
सागराच्या भेटीचा उराशी विचार आहे.
एकरूप होणे तिचे सागराशी,
तिचा जणू हाच श्रृंगार आहे.
(4)
मेरी आँखों में कोई ख़्वाब सजाओ फिर से,
तुम मेरी बाँहों में आकर छूट ही जाओ फिर से।
एक मुद्दत से पड़ा हूँ मैं ख़ामोशी ओढ़े,
अपने होंठों से मेरा नाम बुलाओ फिर से।
एक मुद्दत से जो ठहरा है धुआँ आँखों में,
मेरी पलकों को ज़रा नम सा बनाओ फिर से।
जो मेरे साथ चले थे किसी बरसात के दिन,
उन लम्हों को मेरी यादों में लौटाओ फिर से।
का जाणे कसे हात माझे बांधले,
तुला बिलगण्याची आस बाकी राहिली.
गारवा का वाटतो नकोनकोसा,
का वाटते ऊन माझी सावली.
का दिसतात आरशात चेहरे धूसर,
का तुझी चाहूल मात्र स्पष्ट राहिली.
का सागरालाही तहान लागते,
का नदी किनाऱ्यावाचून वाहिली.
दिल ने भी रख छोड़ा है इक इंतज़ार तेरे लिये,
नजरेत दडवला मी चांदण्यांचा व्यापार तुझ्यासाठी।
दर्द ने सीखा दिया आँखों को मुस्कुराना भी,
अश्रूंनी घडवला मग मोत्यांचा हार तुझ्यासाठी।
चाँद ने दरिया में अपना अक्स उतारा चुपके से,
लाटांनी केला पहारा सारी रात्र तुझ्यासाठी।
दिल की वीरानी में इक शेर अभी तक ज़िंदा है,
मीच जाळला त्याचा प्रत्येक उच्चार तुझ्यासाठी।
धूप ने पत्तों पे लिख दी एक सुनहरी दास्ताँ,
फांद्यांनी धरला त्या कथांचा आधार तुझ्यासाठी।